नांदेड ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरु होणार 🛤️ Nanded – Mumbai Vande Bharat Express Timetable

🛤️ Nanded – Mumbai (CSMT) Vande Bharat Express Timetable (20705/20706)

नांदेड ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सेवा लवकरच सुरू – प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!

नांदेडकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नांदेड येथून थेट मुंबईसाठी वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरु होणार आहे. या गाडीच्या सुरुवातीसाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते आणि आता त्याला यश मिळाले आहे.

या गाडीच्या मागणीसाठी लोहा-कंधारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच ही सेवा प्रत्यक्षात येत आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेही ही मागणी केली होती. अमित शहा यांनी नांदेड भेटीदरम्यान मोठ्या सभेत वंदे भारत सेवा आणि विमानसेवा लवकरच नांदेडहून सुरू होईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडेही चिखलीकर यांनी या मागणीचा पाठपुरावा केला होता.

या गाडीमुळे नांदेड ते मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे. नांदेडच्या विकासाला यामुळे चालना मिळणार असून प्रवाशांना उच्चगती रेल्वेचा लाभ होणार आहे.

गाडीचा संभाव्य वेळापत्रक:

सकाळी 5:00 वाजता नांदेड येथून प्रस्थान

दुपारी 2:25 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आगमन

दुपारी 1:30 वाजता मुंबईहून प्रस्थान

रात्री 10:50 वाजता नांदेड येथे आगमन

As Per Railway Board Notification dated: 12.06.2025

Station20705 Hazur Sahib Nanded – CSMT Vande Bharat (Departure)20706 CSMT – Hazur Sahib Nanded Vande Bharat (Arrival)
Hazur Sahib Nanded05:00 (D)22:50 (A)
Parbhani05:40 / 05:42 (A/D)21:43 / 21:45 (A/D)
Jalna07:02 / 07:05 (A/D)20:05 / 20:07 (A/D)
Aurangabad07:55 / 08:00 (A/D)19:05 / 19:07 (A/D)
Manmad09:58 / 10:03 (A/D)17:18 / 17:20 (A/D)
Nasik Road10:28 / 10:33 (A/D)16:52 / 16:55 (A/D)
Kalyan12:32 / 12:34 (A/D)14:52 / 14:54 (A/D)
Thane13:02 / 13:04 (A/D)14:24 / 14:26 (A/D)
Dadar14:08 / 14:10 (A/D)13:17 / 13:19 (A/D)
CSMT Mumbai14:25 (A)13:10 (D)

ही सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आमदार चिखलीकर यांनी आभार मानले आहेत. वंदे भारत एक्सप्रेसच्या आगमनामुळे नांदेड आणि मुंबई यांच्यातील संपर्क अधिक मजबूत होईल आणि दोन्ही शहरांमध्ये व्यापार, उद्योग व पर्यटनाला नवे वळण मिळेल.

Leave a Comment